अनंत सूर्यमाला, अथांग सागर, अमाप वारा,
कसा रे सांभाळिशी विश्वाचा पसारा ।
देणे आणि देणे हेच तर तुला ठाऊक,
घेता-घेता आणि घेऊन आम्ही होतो का रे भावुक।
तुझेच घेऊन मिरवतो अहंकार,
कधी का नाही मानले तुझे आभार ।
इतके घेऊन सुद्धा अंतरी नाही समाधान,
‘देण्याच्या’ विचाराला मनांत का नाही स्थान ।
वय वाढत चालले पण सापडेना आयुष्या योग्य दिशा
तूच न्यावे पैल तीरा हीच आता मनी आशा ।
तुझ्या स्पर्शाने जीवना अर्थ यावा,
मी तू पण जाऊनी, तुझ्यातच जीव रमावा ।
अरुंधती
No comments:
Post a Comment